Monday, February 9, 2009

भारतात तालीबानी राजवट आली तर....

तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया। ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही.

गेले काही दिवस हा प्रश्न माझ्या मनात घोळत आहे. कधी कधी असे वाटते की हिंदुस्थानात अजूनही 80 कोटी हिंदू आहेत. गांधी-नेहरूंच्या काळात ते जसे निराधार, दुर्बल, हताश होते. कोणीही यावे आणि लाथ घालून जावे अशी हिंदूंची अवस्था होती तशी आज नाही. अजूनही काही हिंदूंची सेक्युलॅरिझमची नशा उतरलेली नाही. तरीपण अनेकांची उतरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानात तालीबानी राजवट येणे शक्य नाही. दुसरा विचार असा येतो की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर, हिंदूंचे खच्चीकरण हाच अजेंडा असलेला कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, त्यातही अर्जुनसिंह, अंतुले, अय्यर (मणीशंकर) हे "अ'पवित्र लोक पुन्हा केंद्रीय मंत्री झाले तर तालीबानी राजवट येण्यात अशक्य ते काय ? हिंदू धर्मीयांचे उच्चाटन होत असेल तर तालीबान्यांना आवतण देण्यास अनेकजण उत्सुक आहेत. सेक्युलॅरिझमची नशा चढलेले हे लोक काहीही करतील.
खोटे वाटते ? तीन वर्षापूर्वी बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी प्रत्येक जाहीर सभेत लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर ओसामा बिन लादेन याच्या वेशातील बहुरुपी होता. एक केंद्रीयमंत्री मतासाठी लादेनचा वापर करतो. दुसरे उदाहरण सोलापूर शहरातील आहे. लादेन या नावाची जगभर चर्चा होत असताना महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती पहाणीनिमित्त एका उर्दू शाळेत गेले. त्या शाळेतील एका वर्गात डोकावल्यावर "ओसामा बिन लादेन झिंदाबाद' असे फळ्यावर लिहिलेले आढळले. उर्दू शाळेत मुलांच्या मनावर लादेनची कोणती प्रतिमा उर्दू शिक्षक ठसवत होते याचा सहज अंदाज येतो. तालीबानी राजवट हिंदुस्थानात येईल की नाही हा वाद थोडा बाजूला ठेवूया. ती आली असे क्षणभर गृहित धरूया. त्यानंतर आपल्या (आता तालीबानी राजवट आल्यावर या देशाला आपला कशाला म्हणायचे. जे कालपर्यंत या देशाला आपला म्हणत नव्हते ते आता आपला देश म्हणतील) देशात काय काय उलथापालथ होईल याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. हे चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. 21 व्या शतकात प्रवेश करताना अफगाणिस्तानात आणि आत्ता पाकिस्तानच्या स्वात या वायव्येकडील प्रांतात तालिबानी जी जीवनपद्धती राबवित आहेत तीच या देशात राबविली जाऊ लागल्यावर काय चित्र दिसेल ते रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे.
तालीबान्यांना चित्रपटाचे एकदम वावडे आहे। चित्रपटात काम करणे इस्लामविरोधी असल्याने शाहरुख, अमीर, सलमान, सैफ अली, अरबाझ, अकबर आणि जे कोणी खान असतील त्या सर्वांना गोळ्या घालून ठार मारले जाईल. पूर्वी काम करत होता म्हणून फिरोजखान, संजयखान हेही सुटणार नाहीत. नाच हा पण इस्लामविरोधी असल्याने सर्व डान्सबार एका फटक्यात बंद होतील. पाकिस्तानमधील एक नर्तिका शबाना ही तालीबान्यांच्या हाती सापडली तर तिला मैदानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डान्सबारला विरोध तर पबचे नावच काढू नका. पब संस्कृतीचे समर्थन करणाऱ्या रेणुका चौधरी, गिरीजा व्यास यांनाही गोळ्या घालून मारले जाईल. खरे तर नौशाद हे माझे आवडते संगीतकार आहेत. त्यांच्याबद्दल असे लिहिताना मला नको वाटते, पण तालीबानी राजवट आल्यावर संगीतकार नौशाद इस्लामविरोधी ठरतील. सनईसम्राट बिस्मिल्लाखान, महान गायक बडे गुलाम अलीखान, तबला सम्राट अल्लारखान हे आता हयात नाहीत. त्यांच्या सी.डी. आहेत. नाचणे, गाणे, वाद्यवादन, चित्रपट हे आक्षेपार्ह असल्याने प्रत्येक गावात अशा सी.डी. गोळा करण्यात येईल. या उप्पर एखाद्याच्या घरी अशी सी.डी. सापडलीच तर तालीबान्याची गोळी त्याच्या छातीतून आरपार गेलीच समजा.

देशात अनेक दर्गे आहेत। त्याच्या उरुसाची सांगता कव्वालीने होत असते. कव्वाली हा प्रकारही इस्लामविरोधी असल्याने कव्वाली आणि कव्वाल इतिहासजमा होईल. मुळात तालीबानी हे वहाबी इस्लामी आहेत. त्यांना फक्त मशीद मान्य आहे. हिंदुस्थानात सध्या जे दर्ग्याचे उदंड पीक आले आहे आणि येत आहे ते तालीबान्यांच्या मते इस्लाम विरोधकांचे षडयंत्र आहे. इस्लामी धर्ममतानुसार अल्लाह हा अमूर्त, निराकार स्वरुपात आहे. दर्गा म्हणजे मूर्तस्वरूप येते. त्यामुळे दर्गा ही कल्पना वहाबी इस्लामला अमान्य आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हे दर्गे कोणा ना कोण्या मर्त्य मानवाच्या नावाने असतात. इस्लामच्या मते सर्वशक्तीमान अल्लाहच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचीही प्रार्थना, पूजा, भक्ती ही इस्लामविरोधी आहे. कोणाला पटो न पटो, तालीबान्यांच्या वहाबी इस्लाममध्ये दर्ग्याला कसलेही स्थान नाही. औरंगजेब कट्टर मुस्लिम होता. मनात आणले असते तर त्याने आपल्या कबरीला मोठ्या दर्ग्याचे स्वरूप दिले असते. पण नाही. संभाजीनगरला जाऊन शहेनशहा औरंगजेबाची कबर पहा. किती लहान व साधी आहे. परवरदिगार श्रेष्ठ मी क्षूद्र अशी औरंगजेबाची धारणा होती. त्यादृष्टीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे हे इस्लामविरोधीच ठरेल. इस्लाममध्ये महिलेची हत्या निषीद्ध आहे. अफझलखानाने तर प्रतापगडावर जाण्यासाठी विजापूर सोडताना आपल्या जनानखान्यातील 69 बायकांना ठार मारले होते. असला अफजलखान पूजनीय होणे आणि धूप जाळू प्रचंड दर्गा बांधणे, तेथे लोकांनी नवस बोलणे हे सर्व इस्लामलाच मंजूर नाही. या पद्धतीने ताजमहालचे काय होईल सांगता येत नाही.

तालीबानी सत्ता आल्यावर शरीयत लागू होणार हे उघड आहे। लक्षात घ्या, बलात्कार अथवा अनैतिक संबंध यासाठी दगडाने ठेचून मृत्यू ही शिक्षा आहे. अफगाणिस्तानात अफूचे भरपूर पीक येते. नशापाणी इस्लामला अमान्य असल्याने काळे सोने समजली जाणारी अफूची सर्व शेते तालीबान्यांनी पैशाचा मोह न ठेवता उद्‌ध्वस्त केली. दारु, चरस, गांजा, अफू, गर्द जवळ बाळगणे, सेवन करणे, विक्री करणे याचा अर्थ फासावर जाणे हा होईल. चोरी केली तर हात तोडणे, दुसऱ्यावर हल्ला करून त्याचा एखादा अवयव निकामी केला तर हल्लेखोराचा तोच अवयव तोडला जाईल. दात पाडला तर दात पाडला जाईल. डोळा फोडला तर हल्लेखोराचा डोळा फोडला जाईल. हे नियम लागू झाल्यावर गुन्ह्यांचे प्रमाण शून्यवत होईल यात शंका नाही. मी स्वत: अशा न्यायव्यवस्थेचे स्वागत करेन. याचा फटका सर्वाधिक फटका कोणाला बसेल हे प्रत्येक गावातील पोलीस रेकॉर्डच सांगेल.

आता अशी तालीबानी राजवट आल्यावर मद्यनिर्मितीचे कारखाने बंद पडतील। विजय मल्ल्या एकदम गरीब माणूस होईल. एम.एच.व्ही. आणि त्यानंतरच्या सगळ्या सीडी कंपन्या बंद पडतील. सध्या 300 चॅनल्स आहेत आणि आणखी 200 येऊ घातली आहेत. पण यापुढे पीस टीव्ही आणि क्यू टीव्ही सोडल्यास अन्य चॅनल दिसणार नाही. झी, सोनी, स्टार, इ टीव्ही, सन, जेमिनी विसरून जा. फार तर पवित्र कुराणाचे मराठीत अर्थ विशद करणारे एखादे मराठी चॅनेल सुरू होईल.

फॅशन हा प्रकारच बंद होईल। बुरखा सक्तीचा आणि पुरुषांना कुडता व टाचेच्या वर दोन इंच तुमान हाच पोषाख. टाचेपर्यंत विजार आली म्हणून एका शिक्षकाला 15 दिवसापूर्वी रस्त्यातच गोळी घालून मारण्यात आले. "येथे दाढी केली जाणार नाही' असा फलक प्रत्येक केशकर्तनालयाबाहेर लावावा लागेल. त्यामुळे न्हाव्याचा धंदा निम्मा तरी कमी होईल.

या सर्वांचा एकत्रित विचार केला तर किती क्षेत्रे बंद होऊन किती रोजगार कमी होईल ते कळेल. प्रमोद मुतालिकचे लग्न झाले नाही म्हणून तो असा वागतो असे म्हणणारी रेणुका चौधरी, प्रमोद मुतालिकला रानटी म्हणणारा सोली सोराबजी आणि फळ्यावर "लादेन झिंदाबाद' असे लिहिणारा उर्दू शिक्षक शिक्षक या सर्वांना या परिणामांचा विचार करावा.

Sunday, February 1, 2009

श्रीराम सेनेचे स्वागतार्ह पाऊल


तरुण मुलगी रात्री 1-2 वाजता घरी आली तरी "इतका वेळ कोठे होतीस, काय करत होतीस?' असा जाब तिला घरच्यांनी विचारायचा नाही, याला स्त्रीमुक्ती म्हणतात का? मुलीला असा जाब विचारणे, कपडे नीट परिधान करायला लावणे, यात कसला स्वातंत्र्याचा संकोच?


ज्यांचे लग्नाचे वय झालेले आहे आणि जे तरुण सध्या वधुसंशोधन करीत आहेत, अशा तरुणांना माझा एक प्रश्न आहे. उद्या, परवा तुम्ही जी मुलगी पाहायला जाणार असाल, ती मुलगी सिगारेट ओढते. जीन किंवा बिअर पिणे हा तिला गावंढळपणा वाटतो. व्हिस्की, रम ती नेहमी घेते. पबमध्ये जाऊन पिणे, तंग कपड्यात झिंगून ओळखीच्या वा अनोळखी तरुणांबरोबर नृत्य नावाचा अश्लील प्रकार, अंगविक्षेप करणे यात तिला काहीच गैर, आक्षेपार्ह वाटत नसेल, तर ही मुलगी बायको म्हणून स्वीकाराल का? जगरहाटी आहे. पोरगी नुसती फिरवायची असेल तर एकदम मॉड, सिगारेट ओढणारी, आपल्याबरोबर डिं्रक्स घेणारी असेल तर फारच छान! पण लग्नाच्या वेळी डोक्यावरून किंवा दोन खांद्यावरून पदर घेणारी सालस पोरगीच हवी असते, बरोबर ना?
काही घरात आता बक्कळ पैसा आला आहे. नवरा-बायको दोघेही गलेलठ्ठ पगारांच्या नोकऱ्या करणारे. त्यातून विमेन्स लिब किंवा स्त्री मुक्तीचे फॅड, मुला-मुलींत फरक करायचा नाही, या चांगल्या विचारांचा विचका या लोकांनी केला. मुलांप्रमाणे पॅंट घालायची, केस कापायचे आणि वाट्टेल तसे बेफाम वागण्यासाठी भरपूर पॉकेटमनी द्यायचा. तरुण मुलगी रात्री 1-2 वाजता घरी आली तरी "इतका वेळ कोठे होतीस, काय करत होतीस?' असा जाब तिला घरच्यांनी विचारायचा नाही, याला स्त्रीमुक्ती म्हणतात का? मुलीला असा जाब विचारणे, कपडे नीट परिधान करायला लावणे, यात कसला स्वातंत्र्याचा संकोच?
तरुण मुलींच्या बापांनो, मुळात मुलींना भलते सलते स्वातंत्र्य देऊ नका, दिलेल्या स्वातंत्र्याचा ती दुरुपयोग करते असे दिसले तर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलला असली तरी तात्काळ शिक्षण बंद करून घरी बसवा. याबाबतीत त्यावेळी हलगर्जीपणा करून आता ढसढसा रडणारे बाप माझ्या पाहण्यात आहेत म्हणून मी सांगतो. त्याहूनही वाईट अवस्था म्हणजे आईबापांची कदर न करता मुलगी परधर्मीयांशी लग्न करते. 5-6 महिन्यांत भ्रमनिरास होऊन माघारी येते. या मुलीला परत घरात घ्यायचे की नाही, अशा पेचात अडकलेल्या बापांची करुण अवस्था मी पाहिली आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या नावाखाली उल्लूपणाला बहर आला आहे!
पुण्यात झालेल्या ब्राह्मण अधिवेशनातील एक किस्सा सांगतो. महिला विषयावरील परिसंवादात अश्विनी धोंगडे नावाच्या एक विदुषी बोलल्या. त्या माजी प्राचार्या आहेत. नको तेच बोलल्या. मुलींनी पॅंट घातली तर बिघडले कोठे? येथपासून आता जानवे घालायची काय गरज? वगैरे. प्रथम शेम शेमच्या घोषणा झाल्या. नंतर श्रोत्यांनी भाषण बंद पाडून अश्विनीबाईस माफी मागायला लावली. अधिवेशनाचे अध्यक्ष घैसास गुरुजी यांनी व्यासपीठावर येऊन या वक्तव्याबद्दल माफी मागितली. जे विचार आक्षेपार्ह आहेत ते एवढ्या खुलेपणाने मांडण्याचा निर्लज्जपणा अंगी आला. कशाने? तर जादा शिक्षण आणि रग्गड पैसा. त्यामुळे या मध्यमवर्गीयांची संस्कृतीशी नाळ एकदम तुटली आहे. या अश्विनीबाईंनी मुलींच्या बेताल वागण्याचे समर्थन करताना तरुणांनीच ते भाषण बंद पाडावे, हे विशेष! यानंतर पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाने लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने शंख केला. पुणे पूर्वी विद्येचे माहेर होते. आता विद्या सासरी गेली आणि सून म्हणून लक्ष्मी पुण्यात ठाण मांडून आहे. लग्न म्हणजे 2-3 वर्षांचा शरीरसंबंध, लग्नाशिवाय आवडेल तितके दिवस एकत्र राहणे, पटले नाही, कंटाळा आला की दुसरा पार्टनर! अशी जीवनपद्धती पुण्यात वाढत आहे. पुण्यातील "ते' दैनिक आणि अश्विनी धोंडगे यांच्यासारखी उच्च विद्याभूषित बाई या पद्धतीचे समर्थन करीत आहेत.
अभद्र लिहिण्याची इच्छा होत नाही, पण स्त्रीशक्ती आणि स्त्रीमुक्ती यातील फरक न कळणाऱ्या या पामरांच्या तरुण मुली पॅंट, आखूड स्कर्टच काय, काहीही न घालता फिरल्या तरी वाद घालायचा नाही. पोलीस पाहून घेतील, पण यांच्या या उद्दीपित करणाऱ्या कपड्यांनी आणि वागण्याने बलात्काराचे कितीतरी प्रकार घडतात. गोव्यातील एक प्रकरण गाजते आहे. दिल्लीत इंडिया गेटजवळ अशीच झिंगलेली तरुण मुलगी मध्यरात्री एका पोलिसाला दिसली. फसला बिचारा. रानात जळणासाठी लाकूडफाटा आणायला गेलेली एकटी दुकटी कष्टकरी महिला आणि मध्यरात्री दारू पिऊन वर्दळ नसलेल्या भागात फिरणारी टंच कपड्यातील तरुणी यात निश्चितच फरक आहे. इंडिया गेटजवळचा पोलीस आणि गोव्यातील मंत्री बाबू मोन्सेरात यांचा मुलगा हे दोषी आहेत, पण त्यांना हे पाप करायला लावणारे जबाबदार कोण?
अश्विनीबाई असे बोलल्या आणि दुसऱ्याच दिवशी कर्नाटकात मंगलोर शहरात एक प्रकार झाला. अश्विनीबाई ज्या जीवनपद्धतीचे समर्थन करीत होत्या, ती जीवनपद्धती अंगिकारलेल्या चांगल्या घरातील काही तरुणी एका पबमध्ये गेल्या. तेथे त्यांनी दारू ढोसली. ती चढल्यावर तेथील संगीताच्या तालावर त्यांचा नाच सुरू झाला. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना हे कळताच सुमारे 50 तरुण पबवर चाल करून गेले. या झिंगलेल्या पोरींना पबच्या बाहेर काढले. या पोरींना स्वत:चा तोलही सांभाळता येत नव्हता. बाहेर येण्यास नकार देणाऱ्या मुलींना थोबाडीत मारण्यासही या तरुणांनी कमी केले नाही. नंतर या मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्यात आले.
श्रीराम सेनेच्या तरुणांच्या या कृत्याचे मी पूर्णपणे समर्थन करतो। त्या तरुणांना शाबासकी देतो. मात्र टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीला या प्रकाराने इंगळ्या डसल्या. तिकडे दिल्लीत रेणुका चौधरी या मंत्रीण बाईने थयथयाट सुरू केला आहे. या तरुणींचे कृत्य गैर असेल तर या मुलींच्या आईबापांनी तशी तक्रार करायला हवी. प्रत्यक्षात एकाही पालकाने तक्रार केली नाही. मला खात्री आहे, आपल्या पोरींची ही झेप पाहून आईबापांना चक्कर आली असेल. या प्रकाराचा होणारा गाजावाजा त्यांनाही नको असेल. बभ्रा झाला तर या मुलींची पुढे लग्ने कशी होणार? अशी या पालकांना चिंता असेल. त्या रेणुका चौधरीचे काय जाते? या मुलांवर खटला भरलाच तर या मुली कोर्टात येऊन काय सांगणार, पबमधून झिंगलेल्या अवस्थेत बाहेर काढले म्हणून? ना बलात्कार, ना विनयभंग. दंगलीच्या कलमाखाली या तरुणांना शिक्षा झाली तरी या मुलींच्या वर्तनाचे एकतरी सभ्य माणूस समर्थन करेल का? हा प्रश्न कॉंग्रेसच्या मंत्रीणबाईने भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा असा क्षुद्र प्रकार राजकीय नाही, टाईम्स नाऊ या चॅनलचा टीआरपी वाढवायचा त्यासाठीचा हा विषय नाही. हा उद्‌ध्वस्त होणाऱ्या घरांचा विषय आहे. एका हातात कंडोम आाणि दुसऱ्या हातात रमची बाटली असलेली आजची तरुणी ही उद्याची आई आहे. ती आपल्या मुलांवर काय संस्कार करणार? यापूर्वीच्या पिढ्यांपुढे हा प्रश्न आला नाही. अध:पतनाला आता सुरुवात झाली आहे. शिक्षण आहे, पण अक्कल नाही! असे समर्थक त्याला लाभत आहेत. हे अध:पतन रोखण्याचे काम कर्नाटकातील श्रीराम सेनेने केले आहे. या सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचे त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा ! सोलापूर शहरातील स्थिती इतक्या उघडपणे नसली तरी बिघडलेलीच आहे. कोण काय म्हणते, याकडे साफ दुर्लक्ष करून तरुणांनी संस्कृती रक्षणाचा वसा उचलावा.

Friday, January 30, 2009

स्वत:लाच कुत्रे म्हणवून घेणारी औलाद

मला आश्चर्य वाटते ते सेन्सॉर बोर्डाचे। भारत म्हणजे झोपडपट्ट्या, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, वेश्या व्यवसाय, जातीय दंगलीत मुस्लिमांची ससेहोलपट असे भारताचे विकृत चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगीच कशी दिली?


प्रसिद्ध देवालयात गेले तर प्रथम दर्शन ओंगळ भिकाऱ्यांचे होते. जेवढे अधिक लाचार तेवढी अधिक कमाई, असे त्या भिकाऱ्यांचे गणित असते. एखादा कुत्रा मालकाच्या हातातील बटर, पावाचा तुकडा मिळवण्यासाठी शेपटी हालवतो, दोन पायावर उभा राहतो, उड्या मारतो. मला आज भिकारी आणि कुत्रा यांची आठवण येण्याचे कारण, "स्लमडॉग'ला मिळालेला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि अनिल कपूरचे कौतुक. हा पुरस्कार कोणता, त्याचे नाव मला आठवत नाही आणि ते लक्षात ठेवायची गरजही वाटत नाही. अगदी ऑस्कर असले तरी गोऱ्या चमडीने छान म्हटल्यावर आपण खुष होऊन नाचायचे, हा प्रकार किती वर्षे चालणार. गोरी चमडी छान म्हणताना चांगल्याला चांगले म्हणत नाही. तसे असते तर इंग्रज अधिकाऱ्यांची जुलूम आणि भारतीय तरुणांची दुर्दम्य इच्छाशक्ती यावर आधारित "लगान' ला ऑस्कर मिळाले असते. ते मिळाले नाही. भारतीयांची मान उंचावणारा चित्रपट त्यांना चालतच नाही, पण स्लमडॉग म्हणजे झोपडपट्टीतील "कुत्रा' असे स्वत:चे नामाभिधान करून काढलेला चित्रपट मात्र लगेच पुरस्कार प्राप्त होतो. अशा नावाचा चित्रपट काढतानाही लाज वाटायला हवी होती. हा चित्रपट केवळ नावापुरताच आक्षेपार्ह असे नाही, त्याची कथा त्याहून आक्षेपार्ह आहे. एका मुस्लिम बाईच्या डोक्यात हिंदू लोखंडी गज मारतो. ती रक्तबंबाळ होऊन पडते. जातीय दंगल, त्यात फक्त मुस्लिमांचे हत्याकांड, त्यांच्या मालमत्तेची हानी, ही दृश्ये शंभर टक्के खरी आहेत का? हे कोणीही सांगावे. दंगल कोण सुरू करते आणि प्रथम वरचष्मा कोणाचा असतो, हे धार्मिक दंगल झालेल्या भारतातील कोणत्याही गावातील लोक सांगतील. मात्र, भारताची बदनामी केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळत नाही.
मला आश्चर्य वाटते ते सेन्सॉर बोर्डाचे. भारत म्हणजे झोपडपट्ट्या, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, वेश्या व्यवसाय, जातीय दंगलीत मुस्लिमांची ससेहोलपट असे भारताचे विकृत चित्र दाखवणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉरने परवानगीच कशी दिली. याउलट कथानक केले, हिंदूंची ससेहोलपट दाखवली, तर सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र देणार आहे का? निश्चितच नाही. हिंदूंवरील अत्याचार "लज्जा' मध्ये शब्दबद्ध करणाऱ्या तस्लिमा नसरीनला भारतात राहू दिले जात नाही, मग तसा चित्रपट कसा मान्य होईल. एकीकडे 2020 पर्यंत भारत एक महासत्ता बनवण्याची स्वप्ने बघायची आणि त्याआधी 11 वर्षे भारताचे विकृत चित्र दाखवणारा चित्रपट बनवायचा आणि त्याचा गौरव हे विसंगत आहे.
कोणाला पटो ना पटो माझे प्रामाणिक मत सांगतो, पूर्वी सत्यजीत रे असेच चित्रपट काढायचे. भारताचे दारिद्रय परदेशात विकून सत्यजीत रे विदेशात बहुमान मिळवतात, असा ते हयात असताना आरोप होत होता. त्यात तथ्यही आहे. सत्यजीत रे यांचा महान दिग्दर्शक म्हणून काहीजण गौरव करतात. मी असहमत आहे. त्यांनी फक्त भिकारडेच चित्रपट काढले. ते येथे मॅटिनीला लावायचे धाडसही वितरकांना होत नव्हते. "सत्यजीत रे रिट्रॉस्पेक्टिव्ह' म्हणून 7 दिवसांत 7 चित्रपट दाखवले जात, मात्र रे यांचा प्रत्येक चित्रपट कोणता तरी आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवत असे. भारत म्हणजे अडाणी, निर्बुद्ध, दरिद्री लोकांचा देश ही भारताची पश्चिमेकडील प्रतिमा सत्यजीत रे यांनी पक्की केली. सत्यजीत रे यांना ती चाकोरी सोडून वेगळे काही करताच आले नाही. पुरावा हवा? कमर्शिअल सिनेमा तुम्हाला काढताच येत नाही, असा आरोप झाल्यावर त्यांनी "शतरंज के खिलाडी' हा कमर्शिअल सिनेमा काढला. तद्दन बंडल सिनेमांच्या यादीत आणखी एकाची भर पडली एवढेच. रे यांच्या आधी प्रभातने "सावकारी पाश'मधून सावकाराकडून पिळवणूक हा विषय मांडला. "माणूस'मध्ये वारांगनेचा विषय मांडला. भालजींनी "साधी माणसं'मध्ये मुंबईतील अनिष्ट प्रवृत्ती दाखवल्या. रे यांच्या समकालीन मेहबूब यांनी "मदर इंडिया'त दारिद्रय, फसवणूक, पिळवणूक, सावकारी, दरोडेखोरी असे सर्व विषय हाताळले. या सर्वांनी विषयाची मांडणी यथातथाच केली, मात्र रे यांनी भडकपणा बटबटीतपणा आणला.
सत्यजीत रे यांच्याबरोबर त्यांचा वारसा संपला असे वाटत असतानाच हा स्लमडॉग आला. विपर्यस्त वातावरण दाखवताना एका गल्लीत श्रीरामचंद्रही दिसतात. त्यांच्या हातातील धनुष्यबाण बघून नायक जमाल पळत सुटतो. किती भंपक कल्पना! हिंदू देवदेवतांना इतक्या स्वस्त रूपात दाखवणे सेन्सॉरला कसे चालले. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा शर्मिला टागोर आहेत. परवा संजय दत्तने आपल्या बहिणीला लग्नानंतर माहेरचे नाव न लावता सासरचे नाव लावण्याचा सल्ला दिला. हा सल्ला शर्मिला टागोरलाही लागू आहे. मन्सूरअली खानची बायको आणि सैफअली खानची आई ही शर्मिला टागोर असेलच कशी? तिने लग्नानंतरचे जे काही नाव असेल त्या नावाने चित्रपट परीक्षण करावे. स्लमडॉग सारखा हिंदूंवर अन्याय करणारा आणि भारताची बदनामी करणारा चित्रपट सेन्सॉर संमत झाल्याचे मग आश्चर्य वाटणार नाही.
या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे म्हणून काही हिंदू धर्माभिमान्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर आम्ही ते प्रदर्शन रोखू शकत नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. ते खरे असेलही. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रानंतर चित्रपट प्रदर्शन रोखता येत नाही असे मात्र नाही. मुंबईतील मराठी-अमराठी वादावर काढलेल्या "देशद्रोही' या चित्रपटाचे प्रदर्शन कायदा, सुव्यवस्था यासाठी रोखण्यात आले. त्याला जेमतेम दोन महिने होत आहेत. यापूर्वी 1975 ला सुचित्रा सेनचा "आँधी' हा चित्रपट इंदिरा गांधींची बदनामी करणारा आहे, असा साक्षात्कार तो रिलीज होऊन बॉक्स ऑफिसवर पडल्यानंतर सरकारला झाला आणि त्यावर बंदी घालण्यात आली. थोडक्यात सेन्सॉर संमत झाला म्हणून सर्व संपले नाही. भारताची विकृत प्रतिमा हा चित्रपट निर्माण करत असल्याने आणि धार्मिक विद्वेष पसरवत असल्याने महाराष्ट्र सरकारने या स्लमडॉगला विष घालून मारावे.

Sunday, January 25, 2009

कला' नव्हे देशद्रोह

"कला' नव्हे देशद्रोह
कला ही कला असते. तिला धर्म, पंथ, भाषा, वर्ण कशाचेच बंधन नसते असे म्हणतात, पण ते तद्दन खोटे आहे. कोणतीही कला ही एखाद्या संस्कृतीचे प्रतीक असते. जेव्हा दोन संस्कृतींमध्येच संघर्ष उद्‌भवलेला असतो तेव्हा कलेविषयीचे विचार बासनात गुंडाळून ठेवायचे असतात. जेव्हा मैत्री, स्नेह, सौहार्दता पाझरत असते तेव्हाच कलेचे पाझरणे क्षम्य असते. सीमेवर आपले सैनिक ज्या संस्कृतीविरुद्ध लढताना धारातिर्थी पडत आहेत, देशात असंख्य निष्पाप नागरिक ज्या संस्कृतीच्या दूतांकरवी मारले जात आहेत त्या संस्कृतीतील कला आणि कलाकार यांचे गोडवे गाणे याला आता देशद्रोहच म्हटले पाहिजे. पाकिस्तान ही संस्कृती आहे. विध्वसंक आणि रानटी असे तिचे स्वरूप आहे. हिंसाचार हा रक्ताचा गुण आहे. इस्लामेतर लोक नाममात्र असताना शियांच्या मशिदीत सुन्नींकडून आणि सुन्नीच्या मशिदीत शियांकडून नमाज चालू असताना बॉबस्फोट होतात आणि नमाजी मारले जातात. कराचीच्या लाल मशिदीत सरकारलाच सैनिक पाठवून गोळीबार करावा लागला. हेच रक्ताळलेले हात आता हिंदुस्थानात वित्त आणि प्राणहानी होईल असे घातपात घडवत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावणे हा प्रकारच अतर्क्य आहे. सेक्युलर आणि कम्युनिस्ट लेखकही सध्या थोबाड आणि लेखण्या बंद ठेवून बसले आहेत.
देशात सर्वत्र पाकिस्तानविषयीची कमालीची चीड निर्माण झाली आहे, असे असताना "सोनी' या वाहिनीने "चिंचपोकळी ते चायना' अशा निरर्थक नावाची विनोदी मालिका सुरू करायचे ठरवले आहे. अंधेरीच्या मोहन स्टुडिओत या मालिकेचे चित्रण सुरू होते. चित्रिकरणात शकील अहमद सिद्दिकी हा पाकिस्तानी विनोदवीर भाग घेत होता. राज ठाकरेंच्या मनसेचे अभय खोपकर यांना हे कळताच कार्यकर्त्यांसह ते स्टुडिओत गेले चित्रिकरण बंद पाडले आणि शकीलला चार दिवसांत मायदेशी जायला सांगितले. तुला जे काही विनोद करायचे ते पाकिस्तानात जाऊन कर असेही खोपकर यांनी बजावले. मनसे आणि खोपकर यांचे अभिनंदन त्याचबरोबर महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचेही अभिनंदन. नेहमीप्रमाणे काही चाबरट पत्रकारांनी गृहमंत्र्यांना मनसेवर कारवाई करणार का म्हणून विचारले. रा.रा. पाटील असते तर ""कायदा हातात घेणाऱ्यांची सरकार गय करणार नाही'' अशी फालतु बडबड त्यांनी केली असती, पण जयंतरावांनी ""पाकिस्तानविषयी चीड असल्याने पाकिस्तानी कलाकारांना कोणी बोलावू नये'' अशी सरकारी भूमिका स्पष्ट केली. कारवाईबद्दल विचारले असता चौकशीनंतर बघू असे मोघमात उत्तर दिले. "सोनी' या वाहिनीला भारतात पुरेसे विनोदवीर मिळाले नाहीत का? भारतीय प्रेक्षकांच्या पैशावर चाललेल्या "सेानी' वाहिनीस पाकिस्तानचे एवढे प्रेम असेल तर "सोनी' वाहिनीवर देशद्राहीपणाचा शिक्का मारून तिच्यावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा. गावोगावच्या केबल ऑपरेटरनी "सोनी' चे प्रेक्षपण फुकट मिळाले तरी नाकारावे. "सोनी' प्रमाणेच एन.डी.टी.व्ही. नावाची एक वाहिनी आहे. या वाहिनीलाही आता कसला तरी झटका आला आहे. सरस्वती आणि भारतमातेची अभद्र, अश्लील चित्रे काढणारा मकबुल फिदा हुसेन हा थेरडा चित्रकार आहे आणि तो थोर चित्रकार आहे म्हणून त्याचा गौरव करण्याचे या वाहिनीने ठरवले आहे. एखाद्या वाहिनीचा वट्ट कमी होतो तेव्हा लोकांच्या तोंडी आपले नाव राहावे यासाठी काही आचरट, काही वादग्रस्त गोष्टी कराव्या लागतात. हुसेनचा गौरव ही त्यापैकीच एन.डी.टी.व्ही ची आचरट कृती आहे. अनेक गुन्हे नोंदवले गेलेला हुसेन भारतात येणार नाही. आला तर त्याला अटक होईल. त्याचा गौरव सोहळा हिंदू धर्माभिमानी उधळून लावतील. हे सर्व माहिती असूनही हुसेनचा गौरव करायला निघालेल्या एन.डी.टी.व्ही.वर बहिष्कार घालावा. आपल्याला अन्य काही जमले नाही तरी देशद्रोही आणि धर्मद्रोही वाहिन्यांना निश्चित धडा शिकवू शकतो.

Friday, January 16, 2009

फरक : मानसरोवर आणि हज यात्रेत

आपला देश सेक्युलर आहे, मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. ऐकून ऐकून तुमचे कान किटले असतील. आता तर सेक्युलर शब्द कानी पडताच माझ्या मस्तकातील शीर तडतडू लागते. तुमचे काय होते मला माहीत नाही. हा देश सेक्युलर आहे यावर माझा कधीच विश्वास बसला नाही. सेक्युलर म्हणजे हिंदुविरोधी असेल तर हा देश नक्कीच सेक्युलर आहे. हा देश मुस्लिम आहे का? राज्यकर्त्यांना तसे म्हणायची लाज वाटते, पण त्यांच्या मनात तसेच आहे. मराठ्यांना ओ.बी.सी.त घालायला काचकुच करताना ख्रिश्चन आणि मुस्लिम ओ.बी.सी, एस.सी, एस.टी मध्ये कधी आणि कसे घुसले ते कळलेले नाही. हा देश सेक्युलर नाही. तो हिंदुविरोधी आणि मुस्लिम समर्थक आहे, याचा प्रथम साक्षात्कार मला 1969 साली झाला.
मोरोक्कोची राजधानी राबात येथे ओ.आय.सी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजचे अधिवेशन होते. मुस्लिम देशांचे संमेलन असेल तर सेक्युलर भारताने तेथे प्रतिनिधी पाठवायची गरजच नव्हती. इंदिरा गांधींनी आपल्या मंत्रिमंडळातील अन्नमंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांना राबातला पाठवले. परिषद सुरू होताच पाकिस्तानचे प्रतिनिधी झुल्फीकार अली भुट्टो यांनी फक्रुद्दीन यांच्या उपस्थितीला हरकत घेतली. भारत हा सेक्युलर देश आहे. मुस्लिम नाही. सबब भारतीय प्रतिनिधीला हाकलून द्यावे, अशी मागणी केली. इतर मुस्लिम देशांनी त्यांना पाठिंबा दिल्यावर फक्रुद्दीन यांनी राबात सोडून तडक दिल्लीला यावयास हवे होते, पण त्यांनी आर्जव केले की, मला प्रेक्षकांच्या गॅलरीत तरी बसू द्या, पण भुट्टोंनी त्यालाही विरोध केल्यावर फक्रुद्दीनना परिषदेतून बाहेर पडावे लागले. अशारीतीने आंतरराष्ट्रीय परिषदेतून भारताची हकालपट्टी होणे हा भारताचा केवढा घोर अपमान होता, पण सेक्युलर कॉंग्रेसला त्याची काहीच लाज वाटली नाही. हा अपमान मुस्लिम कॉजसाठी झाला म्हणून परतल्यावर फक्रुद्दीन यांची पाठ थोपटण्यात आली. त्यावेळी व्ही.व्ही. गिरी राष्ट्रपती होते. ते निवृत्त होताच या फक्रुद्दीनना इंदिरा गांधींनी चक्क राष्ट्रपती केले. तेव्हापासून कोणीही राष्ट्रपती व्हायला लागले आहे.
या प्रसंगानंतर गेली 40 वर्षे अनेक प्रसंगांत हिंदू दमन पाहायला मिळाले. या कॉंग्रेसी राजवटीत पोलीस दलाची अवस्था "म्लेंछ रक्षणाय हिंदू निग्रहणाय' अशी झाली आहे. नव्याने हा विचार मला डाचायचे कारण म्हणजे मानसरोवर यात्रेसाठी डीएव्हीपीकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात. ही यात्रा जशी चीनमध्ये आहे तशीच मुस्लिमांची हाज यात्रा सौदी अरेबियात आहे. हाज यात्रेला जाण्यासाठी देशात अनेक ठिकाणी नोंदणी कार्यालये आहेत. यात्रेकरूंना कमीतकमी त्रास व्हावा म्हणून प्रत्येक प्रांतातून सौदी अरेबियासाठी विमाने सोडली जातात. प्रत्येक वर्षी यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होत असते. हाज यात्रा करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आवश्यक कर्तव्य आहे. मात्र ही यात्रा प्रत्येकाने स्वकष्टार्जित पैशानेच करावी, अशी धर्माज्ञा आहे. असे असताना सरकार प्रत्येक हाजीमागे 14 हजार रु. अनुदान देते. हा खर्च आता 500 कोटी रु. झाला आहे. तो दरवर्षी होतो. हे अनुदान अनुचित आहे. त्या ऐवजी मुस्लिम कल्याणाच्या योजना राबवा, असे काही मुस्लिम विचारवंत म्हणतात. हाज यात्रेच्या निमित्ताने अनेकांचे उखळ पांढरे होत असल्याने अनुदान चालूच आहे. आता हाच न्याय इतरांना आहे का? शिखांचे एक गुरुद्वार पाकिस्तानात नानकाना साहेब येथे आहे. तेथे दरवर्षी काही शीख यात्रेकरू जातात. पाकिस्तानात त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळते. तुच्छतेने वागवले जाते. या सर्वांचा परिणाम म्हणून नानकाना साहेब येथे जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या दरवर्षी घटत आहे. शीख यात्रेकरूंना सरकार कसलेच सहकार्य करीत नाही. पाकिस्तानातील आपला दूतावासही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. हा देश सेक्युलर आहे ना!
आता मानसरोवरचेही पाहा. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 दिवसांच्या यात्रेसाठी दिल्लीहून पहिली तुकडी जाणार असून, 16 वी म्हणजे शेवटीची तुकडी 27 ऑगस्टला जाणार आहे. प्रत्येक तुकडीत 60 जण असतील. म्हणजे 16 तुकड्यांतून फक्त 960 यात्रेकरू ही यात्रा करू शकतील. 80 कोटी हिंदू असलेल्या या देशात हजार लोकही मानसरोवर यात्रा करू शकत नाहीत. हाजसाठी याच्या पाचपट यात्रेकरू जाऊ शकतात. हाजला जाण्यासाठी देशातील अनेक विमानतळांवरून विमाने सुटतात. कोणालाही जास्त धावपळ करावी लागत नाही. मानसरोवरासाठी मात्र सर्वांनी दिल्लीत येणे आवश्यक आहे. चेन्नई, कोचीनच्या माणसानेही दिल्लीत यायचे. येण्यापूर्वी कुँमाऊ विकास निगमच्या नावे 20 हजार रु. भरायचे. ते भरल्यावर तुमची वैद्यकीय तपासणी होईल त्यात अनुत्तीर्ण ठरला तर 20 हजार रु. जप्त होतात. वैद्यकीय तपासण्या करून घेण्यासाठी 3 हजार रु. खर्च येतो. म्हणजे दिल्लीपर्यंत येण्याचा खर्च, तेथे 4 दिवस राहण्याचा खर्च प्रत्येकाच्या बोकांडी बसतो. ही वैद्यकीय तपासणी प्रत्येक राज्यात का करू नये? उघड आहे. 80 कोटींमधील 4-5 हजार लोक तरी यात्रा करण्यासाठी अर्ज भरणार. त्या 5 हजारांतील 4 हजार लोकांना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवायचेच असते. अपात्र ठरवले तरी त्यांच्याकडून पैसे उकळता येतातच. पैशाचे सोडा. हिंदूंच्या पैशावर इथेच कशाला, सर्वत्र डल्ला मारला जात आहे. वाईट बाब पुढेच आहे. ही यात्रा फार जोखमीची आहे, असे सरकार सांगते. मात्र सरकार एकाही यात्रेकरूचा विमा उतरवत नाही. बर्फाचे वादळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती होऊन मृत्यू झाल्यास सरकार पैसाही देणार नाही. एवढेच नव्हे तर चिनी हद्दीत मृत्यू झाला तर मृतदेह भारतात आणण्याची जबाबदारी सरकारने टाळली आहे. अंत्यसंस्कार चिनी हद्दीत करावेत, असे प्रत्येक यात्रेकरूकडून लिहून घेतले जाते. या पूर्वी हाज यात्रेत निवासी तंबूंना आग लागली. सरकारने तत्परतेने मदत केलीच, पण मृतदेह प्रत्येकाच्या गावी पोचवण्याचीही व्यवस्था केली. दुर्दैवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबाबत सरकार एवढे निष्ठूर होते, याचे कारण तो यात्रेकरू हिंदू असतो. हाज आणि मानसरोवर यात्रा यातील फरक पाहिल्यावर असे दिसते की, थोडे पैसे जमवल्यावर कोणीही हाज यात्रा करू शकतो. प्रत्येक शहरातील हाजींची वाढती संख्या त्याचा पुरावा आहे. मानसरोवर यात्रेसाठी तुमच्याकडे खूप पैसा असला तरी शेवटी लॉटरी पद्धतीने निवड होत असल्याने नशीब बलवत्तर असेल तरच जाता येईल.
सेक्युलर देश. धार्मिक यात्रेबाबत समान धोरण असायला हवे, पण मानसरोवर आणि नानकाना साहेब यात्रेबाबत एक धोरण आणि हाज यात्रेबाबत दुसरे धोरण, असा पक्षपात गेली काही वर्षे चालू आहे. तुम्हीच विचार करा.